
पिंपरी:
अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून भरपाई देण्याबाबत यावी अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
खासदार बारणे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
बारणे यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासुन मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असुन या अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने आणि नदी, नाले, धरणभागात आलेल्या पुराने शेतीतील भाताचे रोपे, शेतीचेबांध, शेतीपुरक व्यवसाय (गोटे, पॉलीहाऊस, नर्सरी, पोलट्री इ.) व जोडधंदे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच नागरीकांच्या राहत्या घरांचे अतोनाथ नुकसान झाले आहे. तरी सरदच्या भागातील झालेल्या नुकसानी बाबत त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश मा. तहसिलदार यांना देऊन नुकसान भरपाई देण्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा.
- कोथुर्णेच्या पिडीतीला न्याय कधी?आमदार सुनिल शेळके विधी मंडळात कडाडले
- कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची प्रवासा दरम्यान होणार तारांबळ
- आढले बुद्रुक येथे ३६ फूट ध्वज स्तंभाचे अनावरण
- विद्युत वाहक तारेचा शॉक लागल्याने शिरगावात शेतकऱ्याचा मृत्यू
- पर्वती माणकु काळे यांचे निधन


