खांडशी:
मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील खांडशी गावामध्ये गेली ४ ते ५ दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यांच्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खांडशी,नेसावे ही गावे डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास गाव आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.
तरी वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सरपंच नवनाथ राणे,नंदिनी शिरसट यांच्यासह अन्य सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.
सरपंच राणे व उपसरपंच शिरसट यांच्यासह अन्य सदस्यांनी महावितरणच्या कार्यालयास निवेदन दिले आहे. महावितरणच्या कामशेत कार्यालयाकडुन कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. अशा संबंधित अधिकान्यावर वायरमनवर योग्य तो नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!