
मावळमित्र न्यूज विशेष:
श्रीक्षेत्र देहू व श्रीक्षेत्र आळंदी सह तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणा-या आंद्रा धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. जोरदार पावसाने धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली असून सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.
मावळकरांसह औद्योगिक क्षेत्र आणि देहू आळंदी तीर्थक्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. मागील आठवडाभर धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठयात मोठी वाढ झाली आहे .
धरण परिसरातील सर्व धबधबे ओसांडून वाहत असून ओढे नाल्यांना पूर आला आहे. धरण परिसरातील भात शेतीत पाणीच पाणी साठले आहे.
यंदाच्या हंगामात शंभर टक्के धरण भरलेले आंद्रा हे पहिले धरण ठरणार आहे. त्या पाठोपाठ वाडिवळेतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अंद्रायणी आणि इंद्रायणी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठावर विनाकारण भटकू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


